वेब टीम : अहमदनगर नगर तालुक्यातील ४ चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवत प्रशासनाने छावण्यांची मान्यता रद्द केली. या प्रशासना...
वेब टीम : अहमदनगर
नगर तालुक्यातील ४ चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवत प्रशासनाने छावण्यांची मान्यता रद्द केली. या प्रशासनाच्या कारवाई मुळे जनावरांनावर उपासारीची वेळ आली. प्रशासनाने रद्द छावण्यांंना पुन्हा पूर्ववत मान्यता द्यावी, या मागणीसाठी शेतकर्यांसह शिवसेनेच्यावतीने सोमवार (दि.29) जनावरांंना घेऊन नगर-पुणे बायपास चौकामध्ये रास्तारोको केला. या दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यात पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, नगर तालुका पंचायत समिती सभापती रादास भोर यांच्यासह 50 जणांना ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलन सकाळी दहा वाजता सुरु झाले होते.
नगर तालुक्यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने त्यांचे मान्यता रद्द केली आहे. याबाबत शेरे बुकात कारवाईची कसलीही नोंद नाही. छावणीचालकांना कारवाईची कोणतीही कल्पना दिली गेली नाही. प्रशासनाकडून छावण्यांवर एकतर्फी कारवाई करण्यात आली. चालकांना आपली बाजु मांडण्याची संधी न देता प्रशासनाकडून छावण्या बंद करण्याची कारवाई केली. छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
विसापुर तलावात पाणी नसल्याने घोसपुरी पाणी योजना बंद पडली आहे. पाऊस नसल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत. पाणीटंचाई अन् चारा टंचाईने शेतकरी बेजार झाला असताना प्रशासनाकडून कोणतेही कारण न देता छावण्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप कार्ले यांनी केला.
छावण्यांची मान्यता रद्द केलेल्या गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. कारवाई केलेल्या छावण्यांधील जनावरे दुसर्या गावच्या छावणीत न्या असा सल्ला प्रशासन शेतकर्यांना देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासन छावण्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. त्यामुळे कारवाई केलेल्या छावण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. आंदोलनात सुमारे 500 शेतकरी जनावरांसह सहभागी झाले होते.
COMMENTS