वेब न्यूज : ठाणे पावसाळ्यामध्ये मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक माळशेज घाटात गर्दी करत असतात. पर्यटनासाठी माळशेज घाटात य...
वेब न्यूज : ठाणे
पावसाळ्यामध्ये मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक माळशेज घाटात गर्दी करत असतात. पर्यटनासाठी माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना ३१ जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
माळशेज घाटातील चार धबधबे तसेच पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट या ठिकाणांवर पोलिसांचे खास लक्ष असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही तलाव तसेच लेण्यांजवळ जाण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामध्ये माळशेज घाट, गणेश लेणी, पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा समावेश आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला ही बंदी असेल. घाटातून वाहतूक सुरू असले. मात्र, पर्यटकांना कोठेही थांबता येणार नाही.
पावसाळी पर्यटनासाठीच्या प्रतिबंधित ठिकाणांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. वीकेंडच्या काळात तसेच लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाट असून याची लांबी अंदाजे ९ किलोमीटर आहे. घाटातील बोगद्यापर्यंतचा भाग पुणे जिल्हा हद्दीत, तर तेथून पुढचा भाग ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत येतो.
COMMENTS