वेब टीम : अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जल...
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारण, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देत जिल्हा विकासाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. पूर आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हावासियांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत करुन एकमेकांसाठी अडचणीच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली संस्कृती असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे आणि तात्काळ निर्णय घेतले. दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील ६ लाख ७९ हजार ४३६ शेतकऱ्याऩा ३७३ कोटीहून अधिक अनुदानाचे वितरण केले. आवश्यक तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेत ३४ हजार २५४ कामांचे शेल्फही तयार केले. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण ९६ गावांसाठी ८० कोटी, जलस्वराज्य मधून ४५ कोटी निधी देण्यात आला. मागील ४ वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी ४४ कोटी ८९ लाख रुपये निधी देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण ७४६ गावांसाठी २६८ योजनांसाठी ६६७ कोटी ४२ लाख रुपया्ंची तरतूद केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३ लाख ५ हजार ७०० शेतकर्यांना १ हजार २७ कोटी ६७ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे २ लाख २० हजाराहून अधिक शेतकर्यांना १२१ कोटी २९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे ते म्हणाले.
जलयुक्त शिवार अभियानात मागील ४ वर्षात १ हजार ३५ गावांत ३८ हजार ३४ एवढ्या कामांतून २ लाख २५ हजार ५९७ टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता तयार झाली तर ४ लाख ५१ हजार १९६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील पाच तालुक्यात जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे होत आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत गेल्या ४ वर्षात २७२ तलावातील २ कोटी ७६ लाख ५ हजार ९०३ घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे २ हजार ७६५ घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. पूर आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हावासियांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत करुन एकमेकांसाठी अडचणीच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आपली संस्कृती असल्याचे प्रतिपादन केले.
कृषीपूरक योजनांच्या अंमलबजावतील जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे, कांदाचाळ, नियंत्रित शेती, कृषी अवजारे वाटप आदी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकर्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेत आतापर्यंत ७० लाख ९५ हजार ९६८ इतक्या रोपांची लागवड झाल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात विविध विकासकामे सुरु असून जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्हा अंतर्गत रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी भरीव निधी प्राप्त झाला तसेच जिल्हा नियोजन समितीचा 570 कोटी रुपयांचा अंतिम आराखडाही आपण मंजूर केल्याचे ते म्हणाले.
विविध महामंडळांना आर्थिक सक्षम करुन त्यामार्फत संबंधित समाज घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक समाजघटकांच्या भावना लक्षात घेऊन त्या समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी विविध निर्णय राज्य शासनाने घेतले असल्याचे त्यां
COMMENTS