वेब टीम : मुंबई आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्...
वेब टीम : मुंबई
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे.
तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.
पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो , परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.
फायबरनी परिपूर्ण भाज्या, फळं आणि वजन कमी करण्याचे इतर सगळे उपाय करून देखील तुमचे वजन कमी होत नाही ? मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नक्की पिऊन पहा. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे तुमचे वजन काबूत राहण्यास नक्कीच मदत होते.
शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासून ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अॅनिमियाशी सामना करणार्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
जर तुम्ही चेहर्यावर पडणार्या अकाली सुरकुत्यांमुळे चितिंत असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आता ही चिंता दूर करेल. कारण या पाण्यातील अॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्यावरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.
‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या मते ‘तांबं’ रक्तदाब , हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मद्त होते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणार्या रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते. तांब्यातील खनिजं थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉईड्च्या आजारापासून आराम मिळतो.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते , नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. याचबरोबर हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो.
आधुनिक जीवनशैलीत, आजकाल कर्करोग जडण्याची शक्यता वाढती आहे. अशावेळेस तांब्याच्या अॅन्टीऑक्सिडंट घटकांचा, कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्या शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या मते, तांबं नेमका कॅन्सरशी कसा सामना करतो हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरीही विविध अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी सामना करण्याचे सामर्थ्य असल्याचे समोर आले आहे.
COMMENTS