वेब टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब के...
वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यामुळे युतीचा घोळ आता मिटला असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल असे सांगितले जात आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मुंबईतील तीन नवीन मेट्रोमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना उद्धव म्हणाले की, “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत,”
कम ३७० चा उल्लेख करत उद्धव म्हणाले की “काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं,” असे सांगत “मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं” त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आत्तापर्यंत भाजप सेनेच्यात युतीबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आता उद्धव ठाकरेंनीच मोदींसमोर युतीबद्दल जाहीर विधान केल्याने युतीवर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली.
COMMENTS