वेब टीम : दिल्ली देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आल्या की, सर्जिकल स्ट्राईक करायचा हा आता मोदी सरकारचा पॅटर्न झाला आहे,अशा शब्दा...
वेब टीम : दिल्ली
देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आल्या की, सर्जिकल स्ट्राईक करायचा हा आता मोदी सरकारचा पॅटर्न झाला आहे,अशा शब्दांत काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून दहशतवादी तळं उद्धवस्त केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,”जेव्हा देशात कुठल्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होतात तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करायचा हा मोदी सरकारचा पॅटर्नच झाला आहे.
याद्वारे सर्जिकल स्ट्राइकवरुन खऱ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी राजकारण केले जात आहे.
पाकिस्तानचा घुसखोरांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न हाणून पाडताना भारतीय लष्कराने काल रात्रीपासून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले सुरु केले.
लष्कराने हे दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी आर्टिलरी गनचा वापर केला. ही कारवाई तंगधार सेक्टरमध्ये केली.
यामध्ये बऱ्याच दहशतवाद्यांसह १० पाकिस्तानचे सैनिकही ठार झाल्याचे नुकतेच लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.
COMMENTS