वेब टीम : दिल्ली सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. सरन्यायाध...
वेब टीम : दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली.
बुधवारी सकाळपासून दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद सुरू होता.
पाच वाजेपर्यंत न्यायालयात सुनावणी चालणार होती.
मात्र, चार वाजताच सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
या प्रकरणी २३ दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.
COMMENTS