वेब टीम : अहमदनगर विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावे केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नसतात. मतदारसंघातील ज...
वेब टीम : अहमदनगर
विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावे केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नसतात. मतदारसंघातील जनता या प्रलोभनाला बळी पडणार नाही.
आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे जनता मतपेटीद्वारे दाखवून देणार आहे असे सांगत मतदारसंघातील जनतेचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता आता मतदारांनीच ठरवले आहे आमदाराला मत द्यायचे की नामदारला असे प्रतिपादन राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यानंतर आयोजीत कॉर्नर सभेत ते बोलत होते.
मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठय़ा प्रमाणावर निधी खेचून आणला यामुळे वीज पाणी रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या. आता पुढील काळात शेतीला शाश्वत पाणी मिळावे यासाठी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळ मुक्त करणार आहे. साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. तसेच सुत गिरणी मंजूर करून नऊ कोटीचा निधी मिळवून दिला.
मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील याकरिता बचतगटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. तत्पूर्वी राम शिंदे यांनी नान्नज गावात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच मुस्लिम समाजाची बैठक युवा नेते अमजद पठाण यांनी घडवून आणली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले.
COMMENTS