वेब टीम : अहमदनगर मी महापौर असताना राज्य सरकारकडून सिनानदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला होता. परंतु विरोधी उमेदवारांनी...
वेब टीम : अहमदनगर
मी महापौर असताना राज्य सरकारकडून सिनानदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला होता. परंतु विरोधी उमेदवारांनी हा सीनानदी सुशोभिकरणाचा प्रकल्प बंद करण्याचे काम केले.
त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला. तसेच तपोवन रोडसाठी मी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम सुरु केले, परंतू मी या रस्त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करुन रस्त्याचे काम सुरु केले.
त्यांनी या रस्त्याच्या कामामध्ये आडकाठी आणली नसती तर तपोवन रस्त्याचे काम पुर्ण झाले असते. नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी केले आहे. त्यांनी मात्र प्रत्येक विकासकामांत खोडा घालण्याचे पाप केले.
नगर शहरातील प्रत्येक प्रभागासाठी मी सुमारे 50 कामे केली आहे. त्यांनी त्यांच्या 25 वर्षातील 1 तरी विकासकाम दाखवावे असे आव्हान आ.संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाऊलबुधे, संपत बारस्कर, सुनिल त्र्यंबके, संजय बुधवंत, बाळासाहेब भुजबळ, कुमार वाकळे, निवृत्ती आरु आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, आमच्यासारख्या तरुणांना समाजकार्यात आणून समाजाचे प्रश्न सोडवून घेतले. तीन वेळा नगरसेवक केले. विकासकामे करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम केले आहे. यांची नगरसेवक व्हायची पात्रता नाही त्याला आ.संग्राम जगताप यांनी महापौर केले
. आमदारांमुळे अशा व्यक्तीच्या पाठिमागे उभे राहिलो. आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये तरुण पिढीला राजकारणात आणले आहे. तपोवन रोडचे काम मार्गी लागल्यामुळे उपनगराच्या विस्तारीकरणाला वाव मिळणार आहे. प्र.क्र.2 मधून नगर शहरातील सर्वांत जास्त मताधिक्य देणार आहे.
यावेळी निवृत्ती आरु, विनित पाऊलबुधे, बाळासाहेब पवार आदींची भाषणे झाली.
COMMENTS