lahu kanade वेब टीम : अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामप...
lahu kanade |
वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूरकरांनी चांगलाच दणका दिला. याठिकाणी साहित्यिक व माजी अधिकारी काँग्रेसचे लहू कानडे हे विजयी झाले. कानडे यांनी भाऊसाहेब कांबळे यांचा १९९९४ मतांनी पराभव केला.
शिवसेनेकडून उमेदवारी मिळविलेले भाऊसाहेब कांबळे चार फे-यांनंतर पिछाडीवर पडले. लहू कानडे यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत टिकली. कांबळे यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारीही दिली होती़. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला़.
त्यानंतर त्यांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झाले़ शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली़. त्यानंतर शिवसेनेतील लहू कानडे हे काँगे्रसमध्ये गेले़. त्यांना काँगे्रसने उमेदवारी दिली़. कांबळे यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवत कानडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. त्यांना ऐनवेळी ससाणे गटानेही साथ दिली़.
कांबळे यांच्या बाजुने गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रचार केला होता़. विखे यांच्या टिकेवर ससाणे व कानडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते़. दरम्यान कानडे यांना मतदारांनी कौल दिला आहे.
COMMENTS