वेब टीम : अहमदनगर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे या पदासाठी विद्यमान अध्यक्...
वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे या पदासाठी विद्यमान अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले या प्रमुख दावेदार मानल्या जात असून, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अनुराधा नागवडे यांचेही नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मंगळवारी (दि. 19) मुंबईत ग्रामविकास विभागाच्या प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यात नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची जानेवारी महिन्यात निवड होत असून नवीन पदाधिकार्यांना साधारण दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे असून या लॉटरीमुळे सौ. विखे यावेळीही पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. परंतु मध्यंतरी जिल्ह्यात घडलेल्या राजकीय घडामोडी, पक्षनेत्यांची पक्षांतरे, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीही रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रस्थ वाढले असून अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
COMMENTS