वेब टीम : अयोध्या अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देश...
वेब टीम : अयोध्या
अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर देशभरातील मुस्लीम संघटना, मौलवी आणि मुस्लीम धर्मातील काही व्यक्तीनी, कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरन्यायाधीशांचा आदेश ऑल इंडीया मुस्लीम- ए- मजलिस, मुशावरात या संघटनेचे अध्यक्ष नावीद हमीद यांनी एक बैठक आयोजीत केली होती.
या बैठकीस सहभाग घेतलेल्या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांनी शांतता आणि सामंजस्य बाळगावे, असा ठराव मंजूर केला.
देशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सर्व देशवासियांनी निकालानंतर धीर धरावा.
शांतता धोक्यात येईल असे कोणतेही भडक वक्तव्य करु नये, निकालानंतर सर्व देशवासियांनी धैर्याने निकालाला सामोरे जाण्याचे आवाहन केले.
या बैठकीस जमात- उलेमा-ए हिंद संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदानी, माजी अल्पसख्यंक आयोगाचे अध्यक्ष वजाहत हबिबुल्ला, जमात- ए- इस्लामी हिंदी संघटनेचे अध्यक्ष सदातुल्ल्हा हुसैनी, संसद सदस्य डॉ. जावेद आणि इम्रान हसन उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधिश रंजन गोगोई या नोव्हेंबर १७ तारखेला निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी अयोध्या प्रकरणी निकाल देण्याचे सुतोवाच त्यांनी केले.
निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले.संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.
COMMENTS