वेब टीम : मुंबई भाजप-शिवसेना एकत्र येत नसल्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार का याकडे सगळ्यां...
वेब टीम : मुंबई
भाजप-शिवसेना एकत्र येत नसल्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी या पाठिंब्याबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना, ‘सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा संवाद सुरू आहे. प्रत्येक नेत्याला राज्याविषयीच्या कर्तव्यांची जाण आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय.
त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे’ असं वक्तव्य राऊत यांनी केलं. त्याचबरोबर ‘तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,’ असा सवालही राऊत यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत म्हणाले राऊत, भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही याचं खापर शिवसेनेवर फोडण चुकीचं आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार गोष्टी घडल्या असत्या तर ही वेळ भाजपवर आली नसती.
प्रसंगी विरोधी पक्षात बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही, अशी अहंकारी भूमिका घेतल्यामुळेच भाजपवर ही वेळ आली आहे.
ज्यांनी खोटं बोलून अहंकारामुळे राज्याला या परिस्थितीत ढकललं ते महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. भाजपचा मुख्यमंत्री नको हीच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख पक्षांची भूमिका आहे.
काही मुद्यांवर मतभेद असतात भाजपसोबतही आहेतच. पण, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष अफगाणिस्तानात तयार झालेले नाही. सर्व पक्षांचं राष्ट्राच्या उभारणीत योगदान आहे.
भाजप नको असं म्हणणाऱ्या पक्षांच्या कसोटीचा हा काळ आहे. जे बोलत होतो ते करुन दाखवण्याची वेळ आली आहे.
भूमिकेला चिटकून राहण्याचं आवाहन मी त्यांना करेल. शेतकरी, बेरोजगारी, महागाई या किमानसमान सूत्रांवर हे सरकार स्थापन होणार आहे.
COMMENTS