वेब टीम : मुंबई राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र असून, गंभीर स्वरूपातील घटनांमुळे भीतीचे वातावरण जनतेत निर्माण झाले आ...
वेब टीम : मुंबई
राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र असून, गंभीर स्वरूपातील घटनांमुळे भीतीचे वातावरण जनतेत निर्माण झाले आहे.
मुंबईसह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आ. शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मागील १० दिवसांत गंभीर गुन्हे घडले आहेत. अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही.
त्यामुळे जबाबदाऱ्याही निश्चित नाहीत. त्यामुळे अस्थिर सत्तेचा फायदा गुन्हेगार उचलत असल्याची शंका आ. शेलार यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.
COMMENTS