वेब टीम : अहमदनगर केंद्र शासनाने दिनांक 29 सप्टेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक अधिनियम 1955 अंतर्गत कांदा या जीवनावश्यक वस्तूवर...
वेब टीम : अहमदनगर
केंद्र शासनाने दिनांक 29 सप्टेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक अधिनियम 1955 अंतर्गत कांदा या जीवनावश्यक वस्तूवर लागू असलेले साठवणुकीवर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार व्यापारासाठी 50 मे.टन व किरकोळ व्यापार्यांसाठी 10 मे.टन कांद्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आता केंद्र शासनाने 3 डिसेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार घाऊक व्यापारासाठी 25 मे.टन व किरकोळ व्यापाराकरिता 5 मे. टन कांद्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. त्याअनुसार शासनाच्या दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशान्वये घाऊक व्यापार्यासाठी 25 मे.टन व किरकोळ व्यापार्यासाठी 5 मे.टन कांद्यासाठी साठा निर्बंध लागू करण्यात आलेले असून या कांदा निर्बंधाची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोठेही अशा प्रकारे बेकायदेशीर साठेबाजी निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, अहमदनगर दूरध्वनी क्रमांक 0241-2320236 वर संपर्क साधावा.
बेकायदा साठेबाजीचा व्यापार करणार्या व्यापार्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
COMMENTS