file photo वेब टीम : ठाणे ठाणे शहरातील किसन नगर भागातील क्लस्टरचे भुमीपुजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर डॉ....
file photo |
वेब टीम : ठाणे
ठाणे शहरातील किसन नगर भागातील क्लस्टरचे भुमीपुजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणोकर येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे भुमीपुजन, डेब्रीज प्रकल्पाचे लोकार्पण, प्रकल्प बाधीतांना बीएसयुपी अंतर्गत घरांचे चावी वाटप, दिव्यांगाना सदनिका आणि स्टॉलचे वाटप, आपला दवाखान्याचे लोकार्पण, शहरातील सात ठिकाणच्या खाडी किना:याचा वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंटचे भुमीपुजन, अर्बन जंगल आणि सायन्स पार्कचे भुमीपुजन, अनाथ, निराधार लाभाथ्र्याना अनुदानाचे वाटप, लाडकी लेक दत्तक योजना अंतर्गत अनुदानाचे वापट, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, ठाणो ग्लोबल इम्पॅक्ट हबचे लोकार्पण आणि संकेतस्थळाचे अनावरण आदी महत्वाच्या योजनांचे ई लोकार्पण आणि भुमीपुजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी भाजपचे नाव घेता टोला लगावला. ठाणे आणि शिवसेनेचे मागील 25 वर्षापासूनचे नाते अतूट आहे, त्यामुळेच या ठाणेकर जनेतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरवत आहोत, ठाणेचे रूप बदलले आहे, परंतु ठाणेकर हे अजून साधेच आहेत, ठाणेकरांनी एकदा प्रेम दिल की भरभरून देतो, आज बाळासाहेब व आनंद दिघेची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिका आयुक्तांचे कौतुक करतांना मुंबई मोठी असतांनाही त्याचा विकास अद्यापही हवा तसा झालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांना देखील मी ठाण्यात येऊन येथील प्रकल्पांची पाहणी करावी अशा सुचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचा विकास बघितल्यावर पोटात नाही दुखत उलट छाती अभिमानाने फुगते आहे, त्यामुळे तुम्ही फक्त काय पाहिजे ते सांगा मी ते देण्याची तयारी आमची असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. आज ठाण्यात किसन नगर सारख्या भागात किंवा दिव्यात चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे त्यावर क्लस्टर हा चांगला उपाय आहे. ठाण्यात क्लस्टर वर आंदोलन झाली,. बंद पुकारण्यात आला. परंतु आता सत्ता आली म्हणून आपली बोलती बंद करु नका, जी आश्वासने जनेतेला दिली आहेत, ती पूर्ण करा नाही तर जनता जोडय़ाने मारेल असे खडे बोलही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावले.
COMMENTS