वेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वेगाने होत आहे, त्यामुळे राज्यातील आणि देशातील स्थिती गंभीर आहे. राज्यावर आणि देशावर आले...
वेब टीम : मुंबई
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वेगाने होत आहे, त्यामुळे राज्यातील आणि देशातील स्थिती गंभीर आहे.
राज्यावर आणि देशावर आलेलं हे मोठं संकट आहे.
याही परिस्थितीत लोकं पैसे कमावण्याचा विचार करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे.
यातून आपण कोणत्या थराला जाऊन विचार करतोय, हे लक्षात आलं पाहिजे.
जर कुणी याही परिस्थितीत चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांचावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल.
त्याच्या दोन पिढ्यांना ही कारवाई लक्षात राहील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
पैसा कधीही कमावता येतील, मात्र माणसाचा जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही.
त्यामुळे लोकांनी कृपया करुन असं वागू नका, परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका.
लोकांपर्यत आहे तो माल कसा पोहोचले याचा विचार करा आणि सर्वांना सहकार्य करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
COMMENTS