वेब टीम : मुंबई जळगावचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्वाच्या विषयावर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे खासदार नारायण ...
वेब टीम : मुंबई
जळगावचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्वाच्या विषयावर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.
“उद्धव ठाकरे यापूर्वी अयोध्येत आले होते. त्यावेळी पहिले मंदिर नंतर सरकार असे ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.
सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येईन असे ते म्हणाले होते. त्यानुसार आज ते अयोध्येत आले आहेत” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातून हिंदुत्व सोडले नाही हा संकेत देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदुत्वाचा ठेका कोणी घेतलाय? बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवले आहे.”
हे सरकार शंभर तास चालणार नाही असे भाजपचे नेते म्हणाले होते. पण आज शंभर दिवस पूर्ण झाले आहेत, त्या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “मागे नारायण राणे म्हणाले होते.
गणपती बुडण्याआधी शिवसेना बुडवीन.अकरा दिवस पण सरकार टिकणार नाही. हे नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? ते भाजपचे बकरे बनले आहेत” अशी टीका त्यांनी केली.
शंभर दिवसच नाही हे सरकार पाचवर्ष टिकेल असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.
COMMENTS