वेब टीम : मुंबई जागतिक मंदीमुळे महसुली उत्पन्नात झालेली घट, नैसर्गिक आपत्ती, केंद्राने केलेली अनुदान कपात, कोरोनाचे संकट अशा प्रतिकूल प...
वेब टीम : मुंबई
जागतिक मंदीमुळे महसुली उत्पन्नात झालेली घट, नैसर्गिक आपत्ती, केंद्राने केलेली अनुदान कपात, कोरोनाचे संकट अशा प्रतिकूल परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचे 2020-21 चे अंदाजपत्रक सादर केले.
अंदाजपत्रकात 9 हजार 510 कोटींची महसुली तूट अपेक्षित आहे. आघाडी सरकारचे पहिले अंदाजपत्रक असल्याने विविध वर्गांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्यांसाठी एकवेळ तडजोड योजना राबवण्याची, नियमित कर्ज भरणार्यांसाठी 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
दहा लाख बेरोजगारांसाठी शिकाऊ उमेदवार योजना सुरू करून दरमहा 5 हजार विद्यावेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पर्यावरण रक्षणासाठी पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलीटर 1 रुपया हरितकर लावण्यात आल्याने इंधन महाग होऊन सर्वसामान्यांवर बोजा पडणार आहे.
बांधकाम व्यवसायातील मंदी लक्षात घेऊन मुंबई, पुणे व नागपूर महानगरक्षेत्रातील नोंदणी व मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत देण्याची घोषणाही पवार यांनी अंदाजपत्रकावरील भाषणात केली.
COMMENTS