वेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...
वेब टीम : अहमदनगर
कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले.
मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत जिल्ह्याला झुकते माप देणारच, असे आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमी वार्याची दिशा पाहून राजकारण करणारे विखे या वेळी चांगलेच फसले.
त्यांना खरे तर या वेळी वार्याने फसवले. त्यामुळे त्यांची अडचण झाली, असा उपरोधिक टोला लगावला.
माहीजळगाव येथे आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून सृजन शासकीय योजना, महाराजस्व मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.
या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले आदी उपस्थित होते.
या वेळी तालुक्यातील सरकारच्या विविध विभागांतील योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभवितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला.पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या कोणत्याही मंत्री किंवा आमदाराच्या डोक्यात सत्तेची हवा जाणार नाही.
आम्ही कायम जमिनीवर राहू आणि शेतकरी, महिलांसह सर्व घटकांसाठी काम करू. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत एनआरसी लागू होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कायद्याविरोधात आहेत.
’राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी दिली. काही संघटना नवीन निवृत्तिवेतन योजना लागू करावी, अशी मागणी करीत आहेत; मात्र केंद्राने ही योजना बंद केली आहे.
सध्या जुन्या निवत्तिवेतन योजनेच्या वाटपासाठी ५० हजार कोटी लागत आहेत. सरकारकडे पैसे नाहीत. नवीन योजना लागू केली, तर २० वर्षांनी येणार्या सरकारला फक्त पगार आणि निवृत्तिवेतन अशी दोनच कामे राहतील.
माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, ‘कायम कडक कपडे घालून नुसता गडी आखडून राहत असे. शासकीय निवासस्थानावर त्यांनी ४ कोटी खर्च केला. इतका काय केला तो त्यांनाच विचारा.
आपण ज्या परिस्थितीतून आलो याचे भान प्रत्येक राजकीय नेत्याला असणे गरजेचे आहे.’सिद्धटेक परिसरात भीमा नदीपात्रात बंधारे बांधले जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात शेतकर्यांना पाणी मिळेल, असे त्यांनी या वेळी जाहीर केले.
COMMENTS