वेब टीम : मुंबई लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवर काहीही निर...
वेब टीम : मुंबई
लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे.
त्यामुळे केंद्रीय पातळीवर काहीही निर्णय झाला, तरी राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
लॉकडाउन वाढवण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली.
मुंबई, पुणे व लाल श्रेणीत असलेल्या शहरातील निर्बंध अधिक वाढवले जाण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली.
लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ तारखेला संपणार आहे.
लॉकडाउन वाढवण्याबाबत सर्व राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना १५ तारखेपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
१७ मे नंतर लॉकडाउन सुरू ठेवले तरी अर्थचक्र सुरु रहावे, यासाठी आणखी काय काय करता येतील? याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
तसेच राज्याची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींवरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
COMMENTS