वेब टीम : मुंबई महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा व...
वेब टीम : मुंबई
महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील.
म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे.
अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत.
मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे, असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.
तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही त्या म्हणाल्या.
सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे.
COMMENTS