वेब टीम : दिल्ली आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुव...
वेब टीम : दिल्ली
आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती
आणि म्हणूनच मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते, आणि त्या आदराच्या भावनेनेच मी माझे मत मांडेन, असे वक्तव्य उमा भारती यांनी केले आहे.
भारतीय लोकांनी अमेरिकेत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा
ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत अभिमान बाळगावा, असेही उमा भारती म्हणाल्या.
नेहरू- गांधी कुटुंबाचे अस्तित्व आता संपले आहे. काँग्रेसही आता संपली असल्याचेही त्या म्हणाल्या.
उमा भारती पुढे म्हणाल्या की, कमला हॅरिस या अमेरिकी आहेत, तशाच त्या भारतीय देखील आहेत.
त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकेत जन्माला आलेल्या महिला आहेत.
त्यांच्या संपूर्ण निष्ठा या अमेरिकेशी जोडलेल्या आहेत.
भारतीयांना जर अभिमान बाळगायचाच असेल तर अशा लोकांचा बाळगा जे भारतीय आहेत आणि त्यांनी जगात नाव कमावले आहे.
COMMENTS