वेब टीम : मुंबई मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट आमच्याकडून चुकली, भाऊ तारसेकरांच ऐकलं असतं तर एकट्या भाजपला १...
वेब टीम : मुंबई
मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट आमच्याकडून चुकली,
भाऊ तारसेकरांच ऐकलं असतं तर एकट्या भाजपला १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या,
असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडलं तर संपूर्ण बहुमत म्हणजेच २७२ पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील.
त्यावेळी अनेकांना हे जरा जास्त सांगत आहेत असं वाटलं, पण ते खर ठरलं.
२०१९ मध्ये देखील देशात अस्थिरतेचं वातावरण होतं. बिहार आणि दिल्लीसारखी एखादी निवडणूक हरलो होतो.
अशावेळी अनेकांना वाटत होतं नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष एकत्र झाले होते.
त्यावेळी देखील भाऊ तोरसेकर यांनी भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील असं सांगितलं होतं. ते देखील सत्य झालेलं आपण बघितलं.
खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं.
त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप १५० प्लस किंवा युती २०० प्लस त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला.
तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
COMMENTS