वेब टीम : दिल्ली काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लॉक डाउन दरम्यान प्रवासी मजुरांच्या झा...
वेब टीम : दिल्ली
काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
लॉक डाउन दरम्यान प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद आपल्याकडे नसल्याचे सरकारने म्हटले होते.
यावरून राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडे लॉकडाउनमध्ये प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद नसल्याचे लेखी उत्तराद्वारे सांगितले होते.
“लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आणि किती जणांची नोकरी गेली याची माहिती मोदी सरकारला नाही.
तुम्ही मोजले नाही म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाही का? परंतु सरकारवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
त्यांचे मरण सर्वांनी पाहिले. परंतु एक मोदी सरकार ज्यांना त्याची माहितीही मिळाली नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी ट्विटरवरून सरकारवर ताशेरे ओढले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीं यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत.
त्यांच्यासोबत राहुल गांधी हे देखील परदेशात गेले आहेत.
लॉकडाउनच्या कालावधीत आपापल्या राज्यांमध्ये किती प्रवासी मजुर गेले असा सवाल सरकारला करण्यात आला होता.
तसंच या कालावधीत किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला होता आणि त्याची नोंद सरकारकडे आहे का ?
असे ही विरोधकांकडून विचारले होते. यावर केंद्रीय श्रममंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सरकारकडे अशी नोंद नसल्याची नसल्याचे लेखी उत्तराद्वारे सांगितले.
COMMENTS