वेब टीम : अहमदनगर पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. परंतु, पावसाळा आला की आपल्या मोबाईलची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या...
वेब टीम : अहमदनगर
पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. परंतु, पावसाळा आला की आपल्या मोबाईलची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर रेनकोट, छत्री यांच्या खरेदीबरोबरच मोबाइलसाठी कव्हर, स्क्रीन गार्ड, प्लास्टिक पाऊच यांचीही जोरदार खरेदी होते. ऐन पावसात आपला स्मार्टफोन, तसंच इतर स्मार्ट गॅजेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी काही टिप्स.
धो-धो पावसात स्मार्टफोन भिजला की, चालेनासा होतो आणि नंतर कायमचा बंदही होऊ शकतो. त्यामुळे पावसामध्ये मोबाइल फोनची खास काळजी घ्यावी लागते.
आपला मोबाइल फोन भिजू नये यासाठी सर्वप्रथम तर त्याला चांगले कव्हर असावे. बाजारात मिळणाऱ्या नकली कव्हरपेक्षा मोबाइल कंपनीकडून येणाऱ्या 'ओरिजनल' कव्हरला प्राधान्य द्यावे.
शक्यतो आपल्या पँटच्या खिशात मोबाइल ठेवू नका. पाऊस पडत असेल त्या वेळेस तो आपल्या बॅगमध्ये ठेवणंच पसंत करा. मोबाइल प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवणं कधीही चांगलं. चेन असलेले प्लास्टिक पाऊच बाजारात आता सहज उपलब्ध आहेत.
पावसाळ्यापूर्वी मोबाइलच्या स्क्रीनला 'टॅम्परड ग्लास कव्हर' बसवून घ्या. त्यामुळे मोबाइल भिजला तरी डिस्प्लेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता कमी होते. पावसाळ्यात हेडफोन वा ब्लुटूथ हेडसेटचा वापर करा. जेणेकरून मोबाइल प्लास्टिक पाऊचमधून बाहेर काढण्याची गरज पडणार नाही.
फोन भिजल्यानंतर तात्काळ फोन बंद करून बॅटरी, सिम, मेमरी कार्ड बाहेर काढून ठेवा. मोबाइलमध्ये पाणी शिरल्यानंतर बॅटरीशी संपर्क होऊन त्यात शॉर्टसर्किट होण्याची भीती असते. त्यामुळे सर्वप्रथम बॅटरी काढून घ्या. याशिवाय पाणी सिम कार्ड किंवा मेमरी कार्डसाठीच्या 'स्लॉट'मध्ये शिरल्यास कार्ड खराब होऊ शकतात.
--------------------
पावसात भिजल्याने मोबाईल खराब झालाय...
मग सोनाली इंटरप्रायजेस आहे ना...
मोबाईल रिपेअरिंगसाठी अहमदनगर शहरातील एकमेव विश्वसनीय ठिकाण
सोनाली इंटरप्राइजेज, एम. आर. ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहमदनगर.
मो. ७२१८०२०२०२
--------------------
मोबाइल पूर्णपणे कोरडा होत नाही तोपर्यंत तो चार्ज करण्याच्या भानगडीत पडू नका. अन्यथा शॉर्टसर्किट होऊन केवळ मोबाइलचंच नव्हे, तर स्विच बोर्डचंही नुकसान होऊ शकतं. फोन पूर्णत: कोरडा झाला आहे की नाही, याबाबत साशंकता असल्यास मोबाइल सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवून आणणं कधीही उत्तम.
लॅपटॉप हा न चुकता त्याच्या बॅगमध्येच ठेवा. त्यासाठीही प्लास्टिक पिशवीचा वापर केल्यास उत्तम राहील. एवढी काळजी घेऊनही लॅपटॉप असो, मोबाइल किंवा महागडा कॅमेरा, जर ते भिजलं तर पहिली गोष्ट करा की तुमचं गॅजेट बंद करा. त्यामुळे विद्युत प्रवाह आतल्या सíर्किटपर्यंत पोहोचणार नाही. आणि बरंचसं नुकसान टळेल.
तुमच्या गॅजेटचे भाग सुटे होत असतील, तर आधी ते सुटे करून घ्या. मेमरी कार्ड, सिम कार्ड, मागचं पॅनेल इ. आता हे सुटे भाग सुक्या, स्वच्छ आणि मऊ कपड्यावर मोकळ्या जागेत ठेवा.
गॅजेटच्या वरचं पाणी तर साफ केलं, पण आतल्या पाण्याचं काय? तुमचा मोबाइल किंवा कॅमेरा उलटा करून जोरात हलवा. त्यातील जास्तीत जास्त पाणी बाहेर काढायचा प्रयत्न करा. पण इतकाही जोरात नव्हे की तो खाली पडून त्याला आणखीनच इजा होईल.
यानंतर टॉवेल, टिश्यू किंवा वर्तमानपत्राचा कागद घेऊन तुमचं गॅजेट काळजीपूर्वक पुसून घ्या. त्या वेळी गॅजेटच्या आतल्या खुल्या बोर्डला अपाय होणार नाही याची काळजी घ्या.
एखादी वस्तू पाण्यात पडल्यावर किंवा भिजल्यावर आपण ड्रायर किंवा ब्लोअरचा वापर करतो. पण गॅजेटच्या बाबतीत असं अजिबात करू नका. गरम हवा गॅजेटसाठी चांगली नसते. त्याऐवजी घरात एसी असेल तर त्याच्या थंड हवेसमोर थोड्या मिनिटांसाठी आपलं गॅजेट ठेवा.
याहूनही वेगळी अशी एक ट्रिक म्हणजे, चक्क तांदळांचा वापर करा. तांदळात गॅझेट पुरून ठेवा. एका भांड्यात स्वच्छ निवडलेले तांदूळ घ्या. तुमचं गॅजेट त्या तांदळात पुरून ठेवा. भांड्यावर झाकण लावून बंद करा. या ट्रिकने पूर्ण भिजलेल्या मोबाइलला कोरडं होण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण, तुमच्या गॅजेटची परिस्थिती याहून वाईट असेल तर मात्र ते जास्त वेळ आत ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतो.
तांदळांमधून बाहेर काढताच लगेचच मोबाइल फोन चालू करण्याची घाई करू नका. तुमच्याकडे अल्कोहोल स्पिरीट असेल तर कापसाचा बोळा त्यात बुडवून आतल्या सíर्किटवर फिरवून घ्या. यामुळे अतिरिक्त पाण्याचं बाष्पीभवन होईल व गॅजेट लवकरात लवकर कोरडं होईल. अल्कोहोल स्पिरीट नसल्यास गॅजेटचे सर्व भाग स्वच्छ, मऊ कपड्याने पुसून घ्या.
गॅजेट पूर्ण कोरडं झालं याची खात्री पटल्यावर मगच ते सुरू करा.
COMMENTS