वेब टीम : अहमदनगर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व संरोष बॉंम्ब प्रकरणातील स्वातंत्र सैनिक, क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांना भिंगार कॉंग्रेसच्या...
वेब टीम : अहमदनगर
कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व संरोष बॉंम्ब प्रकरणातील स्वातंत्र सैनिक, क्रांतिकारी रत्नम पिल्ले यांना भिंगार कॉंग्रेसच्यावतीने 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भिंगार येथील सदर बाजार पोलीस स्टेशन मागे त्यांच्या घरी 31 वा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे आर. आर. पिल्ले त्यांनी सांगितले की, ते क्रांतिकारी स्वातंत्र सैनिक होते पण शेवटपर्यंत ते कॉंग्रेस पक्षात होते. रत्नम पिल्ले यांचा जन्म एक एक 1914 साली झाला. वडील लष्करात होते घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, पुण्याहून वडिलांची बदली झाल्यानंतर ते नगरला आले.
नगरमध्ये सोसायटी हायस्कुल मध्ये त्यांनी शिक्षण घेतले, लष्करात ते नोकरीला लागले पंडित नेहरू व इतर क्रांतिकारक यांना नगर किल्ल्यात आल्यावर ते बंदिवान होते, त्यावेळी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व त्यांनी क्रांती करायची ठरवली, ते क्रिकेट खेळायचे भिंगारमध्ये त्यांची टीम होती आणि त्यावेळेस त्यातून त्यांना सरोज टॉकीजवर बॉम्ब टाकण्याचे ठरले व त्यांनी माहिती काढली व पुण्याहून महिलांनी बॉम्ब आणला सरोष बॉम्ब खटल्यातून निर्दोष सुटल्यावर ही त्यांना तीन वर्षे येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध ठेवण्यात आले.
वडिलांचा अंत्यविधी करता आला नाही. त्यांना ब्रिटिश सरकारने स्थानबद्ध असल्याने सोडले नाही नंतर सुटल्यानंतर ते भाई सथ्थांबरोबर समाजसेवा करू लागले व राष्ट्रीय पाठशाळा त्यांनी सांभाळली, आपले जीवन बोनस आहे म्हणून ते शेवटपर्यंत समाजसेवा करत राहिले 1942 ला महात्मा गांधीच्या चलेजाव चळवळीत मांगीलाल भंडारी यांच्यासह भिंगार मधील विणकर समाजातील महिला व पुरुष यांनी मोर्चा काढला होता. त्यावर लाठीहल्ला झाला व पं. नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, श्री. कृपलानी आदी नेते नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध झाल्याने आपण काही तरी देशाकरता करावे हा विचार मनात उत्पन्न झाला त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले.
एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डीनरी फॅक्टरीमधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला, त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीब खान, पन्नालाल चौधरी, श्री खोमणे यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली.
ब्रिटीशांची गर्दी सरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती निवडण्यात आली पिल्लेंनी इशारा केला व हबीबखान यांनी बॉम्ब टाकला, यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मेले व अनेक जखमी झाले खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्समधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले त्यामुळे कोणाला संशय आला नाही त्यावेळेच्या गुजरात-महराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी ही मालिका सुरु झाली या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती त्यावेळच्या रेडिओवर शाबास इंडिया असे उदगार काढले होते
नगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन याना मुबईहुन बोलावून याची केस चालविण्यास सांगितले बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी 3 वर्षे तुरुंगात डांबले. स्वातंत्र मिळाल्यावर त्यांची सुटका झाली.
सध्या पिल्ले यांची मुले भिंगारमध्येच असून, एक नोटरी आर. आर. पिल्ले असून दुसरा गोपाळ पिल्ले यांचे आटोमोबाइलचे दुकान आहे, आजच्या तरुण पिढीला यागोष्टी समजल्या पाहिजे, यासाठी या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेसचे अध्यक्ष आर. आर. पिल्ले, राज्य सदस्य शामराव वाघमारे, महिला अध्यक्ष मार्गारेट जाधव, साहेबराव चौधरी, अनिल परदेशी, संतोष फुलारी, संजय झोडगे, निजाम पठाण, सोपानराव साळुंके आदींनी केले आहे.
COMMENTS