वेब टीम : मुंबई वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या...
वेब टीम : मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांनी निदर्शने करत मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली.
मोदी सरकारने केलेल्या कायद्याला कोणी विरोध करीत असेल तर त्यांचे नागरिकत्व काढून घ्यायचा डाव भाजप सरकारचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
सरकार विरोधात लढल पाहिजे, आंदोलन केली पाहिजेत असा निर्धार करताना हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
मुंबई पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
आम्ही आंदोलन करणार, हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा, असे आव्हान देत त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते.
नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होत्या. दादरच्या खोदादाद सर्कल येथे हे आंदोलन सुरु होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दादर टीटी सर्कल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सीएए लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. या आंदोलनांने आम्ही विरोध करत आहोत. आता हे धरणे आंदोलन थांबवत आहे, असे सांगत त्यांनी आपले आंदोलन आटोपते घेतले.
हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहेच. त्याचसोबत हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात. हा आरएसएस आणि भाजपचा मोठा डाव आहे. जो या का द्याला विरोध करेल त्यांचे नागरिकत्व काढून घ्यायचा यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
COMMENTS