वेब टीम : संभाजीनगर सगळ केलं तरी सोडून गेलेले आमदार खोटं बोलतात याची खंत वाटते. सगळे नीट चालले असताना गद्दारी का केली. यानांसर्व...
वेब टीम : संभाजीनगर
सगळ केलं तरी सोडून गेलेले आमदार खोटं बोलतात याची खंत वाटते. सगळे नीट चालले असताना गद्दारी का केली. यानांसर्व दिलं आज लिहून घ्या हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे सत्य आहे.
शिवसेनेने बद्दल आदर म्हणतात आज त्यांची वाक्य बघा त्यांच्यानातील विष बाहेर येत आहे. इतकं विष कसं आल माहीत नाही. महाराष्ट्र विकास करत होता. यांनी दगा केला कळलं नाही मिठी मारली मात्र यांच्या हातात खंजीर होता. हे माहीत नव्हत.
पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे साहेब यांना दोन महिने हलता येत नव्हतं. महाराष्ट्राचे काम थांबू नये म्हणून ते काम करत होते.
रोज अपडेट घेत होते. मात्र दुसऱ्या बाजूला गद्दार जमवाजमव करत होते. पक्ष फोडण्याचे धंदे करत होते. पक्ष प्रमुख आपल्या वेदना दूर ठेऊन काम करत होते, तर हे पाप करत होते. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
संभाजीनगर येथे आयोजित सभेत युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाना साधला.
औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा संभाजीनगर व धाराशिव असे नामांतर केले, नामांतर करताना जातीत व धर्मात भेदाभेद न करता तसेच कुठलाही वाद न करता सर्वांच्या विश्वासाने हे नामांतर केले. त्यामुळे त्यांच्या पोटात दुःखले असेल. त्यांना दंगली घडवून नामांतर करायचं होत.
COMMENTS