वेब टीम : अहमदनगर स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यदिना निमित्ताने भारतीय जनता पार्टी मध्य मंडळाच्या वतीने चौपटी कारंजा...
वेब टीम : अहमदनगर
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यदिना निमित्ताने भारतीय जनता पार्टी मध्य मंडळाच्या वतीने चौपटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले की प्राचीन काळामध्ये त्यांच्या एवढ्या धैर्याचे पुरुष फार थोडे होऊन गेले. त्यांचे जीवन चरित्र म्हणजे चालता बोलता भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आहे.
सावरकरांच्या भाषणातून, स्फूट लेखातून त्यांची ज्वाजल्य पूर्ण राष्ट्रभक्ती प्रकर्षाने जाणवते. तुजविण जनन ते मरण या काव्यामधून त्यांची मातृभूमी विषयीची तळमळ व्यक्त होते. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात त्यांचे स्थान अद्वितीय आहे.
कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, लक्ष्मीकांत तिवारी, राहुल कवडे,विनायक वाघ, देवेंद्र बेरड, प्रशांत मिसाळ, अक्षय दातरंगे, बाबू पाचरणे, सुचित भळगट, आनंद बेल्हेकर, पोपट कांडेकर, दिलीप गायकवाड, पिंटू गहिले, संदीप देशपांडे, विजय मैड, शरद पडदुने, बाळासाहेब देवतरसे,कैलास गहीले, अजय गहीले,पियुष चितळे,उपस्थित होते.
COMMENTS