वेब टीम : नागपूर ‘महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता. पण महाविकास आघाडी सत्तेवर आली. ही आघाडी सर्व तत्त्व व विचारधारांना मूठमा...
वेब टीम : नागपूर
‘महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता. पण महाविकास आघाडी सत्तेवर आली. ही आघाडी सर्व तत्त्व व विचारधारांना मूठमाती देऊन झालेली आहे.बाळासाहेब असते तर अशी आघाडी झाली नसती,’ असे नारायण राणे म्हणाले.
‘आम्ही आघाडीत गेलो म्हणजे धर्मांतर केले नाही,’ या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ‘मी हिंदुत्ववादी आहे हे सोनिया गांधींना सांगा,’ असे राणे म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस हा ‘टॅक्स फ्री’ पक्ष आहे. तो कुठेही जातो,’ असा टोला त्यांनी हाणला.
मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विराचांशी बेईमानी केली,” असा आरोप माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.
नव्या सरकारवर टीका करताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकदा एकेरी उल्लेख केला. तसेच, ‘त्यांच्या क्षमतेबद्दल मला शंका आहे,’ असेही ते म्हणाले.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे पहिलेच अधिवेशन नागपुरात सुरू आहे.त्यामुळे या अधिवेशनाबद्दल सर्वसामान्यांबरोबरच नेत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे.
त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुसऱ्याच दिवशी नागपुरात दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तिथे पोहोचले होते. आज नारायण राणे हेही अधिवेशनस्थळी पोहोचले.
COMMENTS