वेब टीम : दिल्ली जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस कारवाई आणि तीव्र आंदोलनाच्या घटनेवर कुलगुरू नजमा अख्तर यांनी नाराजी व्यक्त क...
वेब टीम : दिल्ली
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस कारवाई आणि तीव्र आंदोलनाच्या घटनेवर कुलगुरू नजमा अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली.
आमच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईने दुःख झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.आम्ही पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.
जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल कुलगुरू अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली.
जमिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई कशी होईल,असा प्रश्न त्यांनी केला. आगीच्या घटनेत विद्यार्थी सहभागी असल्याच्या वृत्ताचे ही त्यांनी खंडन केले.
विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसां विरोधात तक्रार करणार असल्याचे कुलगुरू अख्तर म्हणाल्या.”आमच्या विद्यापीठाचे खूप नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कशी होईल? विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यांना मारहाण झाली आहे.विद्यापीठात हिंसक घटना घडली.त्यामुळे आम्ही चिंतीत आहोत.विद्यापीठात प्रवेश करणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार करणार आहोत,”असे अख्तर यांनी सांगितले.
अशा घटना घडल्यानंतर बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. जामियामधील घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचीही अफवा पसरली आहे. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांना पोलीस घेऊन गेले होते.
त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी आमचा पूर्ण कर्मचारी वर्ग रात्रभर जागा होता.या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्याकडे वेळ नव्हता. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.त्यांच्या पालकांशी संपर्क झाला आहे. काही बाहेरील तरूण आहेत.
त्यांचीही सुटका केली आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी नसले तरी, ती सुद्धा मुलं आहेत,असे अख्तर म्हणाल्या. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली.
COMMENTS