file photo वेब टीम : ऑकलंड न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच...
file photo |
वेब टीम : ऑकलंड
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
या पराभवामुळे टीम इंडियाचा वनडे मालिकेतही पराभव पत्कारावा लागला आहे.
भारताविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0ने खिशात घातली आहे.
भारतापुढे न्यूझीलंडने 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर (52) आणि रवींद्र जडेजाने (55) धावांची अर्धशतकी खेळी केली.
जवळपास 6 महिन्याने टीम इंडियाच्या वनडे संघात पुनरागमन केलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलने 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.
COMMENTS