वेब टीम : मुंबई नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं. अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या देशात ‘लॉकडाऊन’ क...
वेब टीम : मुंबई
नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं. अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. मात्र लोक आजही घराबाहेर पडताना दिसून येत आहे.
अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे, राज्यातील रोनाबाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या गंभीर आहे.
नागरिकांनी गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी. महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी वेळीच सावध व्हायला हवं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, देशातील पहिले ‘कौरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन आपल्या घरी परतत आहे त्याचा आनंद आहे.
होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले
तसेच राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहणार आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही कमतरता नाही.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल. असा विश्वास देतांनाच नागरिकांना खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असं आवाहन अजित पवार यांनी आहे.
COMMENTS