वेब टीम : दिल्ली लोकसभेत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट...
वेब टीम : दिल्ली
लोकसभेत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिल होत. शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलं नाहीच मात्र, खतांचे भाव दुप्पट झाले, असं ते म्हणाले.
२०२२ पर्यंत सर्वांना घरं देण्याचं मोदी म्हणाले होते. मात्र आता म्हणताहेत २०३० पर्यंत. या सरकार गरिबांना फक्त स्वप्न दाखवली. आयुष्यमान भारत योजना चांगली. पण किती गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी मदत मिळाली याचीही माहिती सर्वांना देणे आवश्यक आहे.
राम मंदिर बनवायचं श्रेय सुप्रीम कोर्टाला जात. आम्ही संसदेत म्हणालो होतो. संसदेत कायदा आणा. पण सरकारने कायदा आणला नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यावर मोदींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं. बाबरी पडली नसती तर राम मंदिर झालं नसत.
बाबरी पडल्यावर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषद सगळे म्हणाले की आम्ही बाबरी पाडली नाही. ते म्हणाले शिवसेनेने बाबरी पाडली. बाळासाहेबांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.
भाजप वाल्यांनी प्रमोद महाजन यांचे जुने भाषणं ऐकावेत. ते म्हणाले होते की हिंदूंचा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. राज्यात सरकार बदलल्यावर भाजपचे लोकं आमच्या हिंदुत्वावर तुम्ही टीका करता पण जेव्हा काश्मिरात तुम्ही सरकार स्थापन केले त्यावेळी तुम्ही कुणासोबत गेले होते.
उत्तरप्रदेशात मायावतींना यांनी सपोर्ट केला. बिहारमध्ये नितीशकुमार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आल्यावर यांनी त्यांचे आमदार कमी असतानाही नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं. ज्या शिवसेनेने २५ वर्षे तुम्हाला बोट धरून हिदुस्तानाचं हिंदुत्व तुम्हाला शिकवलं त्याच शिवसेनेवर हिंदुत्वावरून तुम्ही आज बोलताय, असा टोलाही जाधव यांनी लगावला.
३७० कलम काढल्यावर काय मिळालं? जे काश्मिरी पंडित विस्थापित झाले होते त्यांचं कुणाचं घर तुम्ही दोन वर्षात पुन्हा काश्मिरात वसवलं का? एखाद्या पंडिताला त्यांची जमीन मिळवून दिली का? फक्त जुमलेबाजी होत आहे. लोकांना फसवण्यात येतंय. सुजय विखेंनी भाषण केलं. पण त्यांचा जन्म झाल्यापासून खासदार बनेपर्यंत ते युपीएमध्येच होते, असेही ते म्हणाले.