वेब टीम : औरंगाबाद रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या ...
वेब टीम : औरंगाबाद
रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत.
यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे.
लातूर येथील प्रक्रिया उद्योजकांनी मंगळवारी सोयाबीनची खरेदी हे तब्बल 7 हजार 700 रुपये क्विंटलप्रमाणे केली आहे. तर दुसरीकडे अर्जेंटिना रशिया आणि युक्रेन येथून सुर्यफुलाचे तेल आयात ठप्प झाली आहे.
परिणामी तेलासाठी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची मागणी वाढली आहे. याचाच परिणाम दरावरही होताना दिसत आहे.सध्या सोयाबीनला हंगामातील उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होणार की घटणार यामुळे विक्रीबाबत शेतकरी हे संभ्रम अवस्थेत आहेत.
खरीप हंगामातील सोयाबीन जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन हेच मुख्य पीक असल्याने झालेले नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच हंगामाच्या सुरवातीला दरही कवडीमोल मिळाला होता.
मात्र, शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री नाही ही भूमिका घेतल्यानेच आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेली दराची घोडदौड अजूनही कायम आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दर हे वाढलेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे दर हे दुप्पट झाले आहेत. मात्र, सध्या अस्थिर दरामुळे आणि य़ुध्दजन्य परस्थितीचा अणखी किती परिणाम होणार यामुळे साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न कायम आहे.
पण 7 हजार 500 हा दर चांगला असून अधिकचे नुकसान न होऊ देता या दरात शेतकऱ्यांनी विक्रीलाच प्राधान्य देण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत.
COMMENTS