घरावर तिरंगा उभारून राष्ट्रीय एकात्मता जपा : भाऊसाहेब शिंदे पारनेर प्रतिनिधी : स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या...
घरावर तिरंगा उभारून राष्ट्रीय एकात्मता जपा : भाऊसाहेब शिंदे
पारनेर प्रतिनिधी :
स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान साजरे होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विविध उपक्रम राबवले जात असून केंद्र सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर आपला तिरंगा झेंडा फडकवून राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे असे मत पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
दरम्यान यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले की राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा उभारून देशाप्रती असलेला आदरभाव जोपासला पाहिजे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना निश्चितच आपण आज विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहोत. आज आपल्या स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात आपण अनेक यशाची उंच उंच शिखरे सर केली आहेत.
भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी वर्ष साजरी करत असताना त्यांच्या या शौर्याचे आपण स्मरण केले पाहिजे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना देशात मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम होणे गरजेचे आहे.
असेही यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे म्हणाले
विकासात्मक पातळीवर काम करत असताना निश्चितच देश अभिमान आपण जागृत ठेवणे गरजेचे असून आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता व देशभक्ती आपण जपली पाहिजे. तिरंग्याचा अभिमान ठेवत आपण सर्वांनी अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपल्या घरावर भारताचा सार्वभौम असलेला तिरंगा डौलाने फडकवून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने देशभक्ती दाखवून द्यावी. असे ही मत यावेळी वडगाव सावताळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.