वेब टीम मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ...
वेब टीम
मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेनेत रस्सीखेच सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सरकारवर चौफेर टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘भाजपच्या कालच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. हे विस्मरण कसं झालं? शिवाजी महाराज स्मारकाची अजून एक वीटही रचली गेली नाही. आता शिवशाही सरकार आणू म्हणतात. पण भाजपने त्यांचा अपमान केला आहे,’ असं म्हणत शिवस्मारकावरून धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, मुंडे यांनी गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका अशा आशयाच ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
COMMENTS