वेब टीम : मुंबई भाजपात अनेक पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला असला केला. परंतु आमची युती राहणार आहे. आम्ही विधानसभा निवडणुका ‘महायुती’तूनच...
वेब टीम : मुंबई
भाजपात अनेक पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला असला केला. परंतु आमची युती राहणार आहे. आम्ही विधानसभा निवडणुका ‘महायुती’तूनच लढवणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.31) केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांना दणका देत माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ अशा बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचे ठामपणे सांगितले.
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुका या एकत्र लढल्या. विधानसभा निवडणुका देखील आम्ही महायुतीतच लढणार आहोत. यात जागांच्या बोलणी संदर्भात पुढील 10-15 दिवसांत निर्णय घेतले जातील. काही आमच्या जागा त्यांना जातील, त्यांच्या आम्हाला येतील, तो निर्णय आम्ही एकत्र येऊन घेऊ. पण आम्ही महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
COMMENTS