वेब टीम : अहमदनगर सोनई करजगाव सह अठरा गावाची पाणी योजना तातडीने सुरू करावी व ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चाल...
वेब टीम : अहमदनगर
सोनई करजगाव सह अठरा गावाची पाणी योजना तातडीने सुरू करावी व ती योजना सुरु होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी, कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चॉकशी करावी , योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालीसुमारे पाचशे ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले होते. अखेर तीन दिवसात योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
एक जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्या समवेत अठरा गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी दिले होते परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसले. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता .
प्राधिकरनाच्या ऑफिसमध्ये उपोषणकर्ते आले त्यांनी तेथे ठिय्या मांडला व टाळ ,मृदंगसह जप चालू केला . अधिकारी , ठेकेदार व नेवशाचे आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित , दगडुभाई इनामदार , सुभाष जाधव , बाळासाहेब वायभासे , केशव औटी , रमेश पुंड , गोरक माकोने , चंद्रकांत टेमक ,अण्णासाहेब मकोने , 18 गावातील सरपंच ,उप सरपंच , क्रांतिकारी पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
माध्यमांशी बोलतांना माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की राहुरी तालुक्यातील 3 गावांना दिलेले अनधिकृतपणे कनेक्शन दिल्यामुळे नेवासा तालुक्यातील 18 गावांची पाणी योजना अडचणीत आली आहे तसेच पूर्ण दाबाने पाणी येत नाही व टाक्या भरत नाही राहुरीचे गावे जोडण्यासाठी नेवशाच्या लोकप्रतिनिधींनी लेखी समंती दिली आहे . या योजनेचे छोटे मोठे कामे अपूर्ण असतांनाही ठेकेदाराला पेमेंट दिले गेले आहे यात मोठा भ्रष्टाचार झाला असून याची चवकशी करण्याची मागणी आहे . कामे अपूर्ण असतांना योजना हस्ततारण करण्याचा घाट घातला जात आहे.
गडाखांच्या आंदोलनाला मिळाले यश ; 4 दिवसात पाणी योजना सुरू होणार
दि 27 जुलै रोजी पाणी योजना सुरू होणार कार्यकारी अभियंता यांनी लेखी दिले . नाशिकचे मुख्य अभियंता लांडगे यांच्याशी शंकरराव गडाख यांची भ्रमणध्वनी दारे चर्चा झाली. राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच नासिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासमवेत गडाख व सर्व गावातील सरपंचाची बैठक होणार आहे . ब्राम्हणी , उंबरे व पिंप्री येथील नळ जोडणी बंद करण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन मिळाले.
COMMENTS