वेब टीम : जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान ...
वेब टीम : जम्मू
काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने भारतीय लष्कर आणि हवाई दलाल हाय अलर्टलवर ठेवलं आहे.
राष्ट्रीय रायफल्स आणि सीमारेषेवर तैनात इतर जवानांना काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
गुरुवारु संध्याकाळपासूनच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालत आहेत. हा ऑपरेशनल अलर्टचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. जवानांची संख्या वाढवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही गस्त घातली जात आहे.
सुरक्षा दलाच्या २८० कंपन्या म्हणजे तब्बल २८ हजार जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत.
यामध्ये सीआरपीएफ जवानांची संख्या जास्त आहे. खोऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि प्रशिक्षणासाठी जवानांना खोऱ्यात पाठवत असल्याचं सांगितलं आहे.
COMMENTS