वेब टीम : अहमदनगर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाचीच सत्ता येणार असून अहमदनगरचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्...
वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाचीच सत्ता येणार असून अहमदनगरचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला.
या भागातील साकळाई उपसा जलसिंचन योजना खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी ( ता. नगर ) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ८७ लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, अनिल कराळे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, पंचायत समिती उपसभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, रवींद्र भापकर, सरपंच मीनाक्षी जगदाळे, दिपाली गोरे, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत, प्रकाश कुलट उपस्थित होते.
COMMENTS