वेब टीम : अहमदनगर पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दै...
वेब टीम : अहमदनगर
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
या अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय : २९) रा.कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय : २८) रा. दरेवाडी हे दोघे संगमनेर तालुक्यातील असून अजय श्रीधर पेदाम (वय : २७) हा रा.पांजरे, ता.चंद्रपूर येथील आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे वरून संगमनेरच्या दिशेने जाताना कर्हे घाटात कार (एमएच.१९, बीजी ८१११) पुढे चाललेल्या ट्रकला (एमएच.१२, केपी १७९९) पाठीमागून धडकली.
अपघात इतका भीषण होता की, कारमधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना बाहेर काढले.
या भीषण अपघातामुळे पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री बऱ्याचवेळ विस्कळीत होती.
COMMENTS