वेब टीम : अहमदनगर विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्यांदा विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी (दि.25) सायंकाळी आ.संग्राम जगताप यांनी दिवंगत नगरसेवक...
वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्यांदा विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी (दि.25) सायंकाळी आ.संग्राम जगताप यांनी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी आ.जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबियही भावनाविवश झाले होते.
नगर शहराच्या राजकारणात कै.गिरवले यांनी नेहेमीच जगताप कुटुंबियांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दु:खातही त्यांची साथ कायम असायची.
केडगाव हत्त्याकांडात आ.संग्राम जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता.
शेवटपर्यंत साथ देणार्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबियांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच आ.जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबियांचे भेट घेतली.
यावेळी गिरवले कुटुंबियांच्यावतीने कै.कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला गिरवले, बंधु विलास गिरवले, सुचित्रा गिरवले, शशिकांत गायकवाड, पल्लवी गायकवाड आदींनी आ.जगताप यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याबद्दल कौटुंबिक सत्कार केला.
COMMENTS