वेब टीम : उल्हासनगर विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यानच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ ...
वेब टीम : उल्हासनगर
विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यानच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले.जागावाटपावरून ते नाराज असल्याचे समजते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाली असली तरी नाराजी आणि बंडखोरीचा फटका बसत असल्याचे दिसते.ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत ही नाराजीचा सूर उमटत आहे.
या नाराजीमुळेच आज सकाळी २६ नगरसेवकांनी राजीनामे दिले. या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसह भाजपच्याही अडचणी वाढल्या आहेत.
स्थानिक नेता धनंजय बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेची उमेदवारी शिवसेनेच्या नेत्याला मिळावी अशी या कार्यकर्त्यांची इच्छा होती.
मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली.
ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांपैकी काही अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे.
COMMENTS