वेब टीम : अहमदनगर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या ८४५ मतांनी पराभव झाला असून, याठिकाणी राष्ट्...
वेब टीम : अहमदनगर
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या ८४५ मतांनी पराभव झाला असून, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी विजय मिळवला आहे.
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे व जिल्ह्या परिषद सदस्य राजेश परजणे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. त्यांना १५ हजार ३८२ मते मिळाली आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या पराभवाला परजणे यांची बंडखोरी कारणीभूत ठरली आहे.
परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती. मात्र हाती आलेल्या निकाल पाहता हा अंदाज खरा ठरला आहे. परजणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विखे कुटंबाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे सांगितले असल्याचे बोलले जात होते. मात्र शेवटपर्यंत परजणे आपल्या निर्णयावर ठाम राहत, त्यांनी निवडणूक लढवली.
कोल्हे यांना 86 हजार ७१४ मते मिळाली आहेत, तर काळे यांना ८७ हजार ५८९ मते मिळाली. विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांना १५ हजार ३८२ मते मिळाली. विशेष म्हणजे परजणे यांनी जर माघार घेतली असती तर त्यांची मते भाजपला मिळाली असती व कोल्हे यांचा सहज विजय झाला असता, असा दावा आता करण्यात येत आहे.
COMMENTS