वेब टीम : दिल्ली महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेला देशभक्त होता, असे वक्तव्य खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभे...
वेब टीम : दिल्ली
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेला देशभक्त होता, असे वक्तव्य खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत केल्याने मोठा गदारोळ उडाला.
साध्वींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “साध्वी प्रज्ञासिंह यांना मी कधीच मनापासून माफ करणार नाही” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वींनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यावर टीका करत म्हले होते.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकूर यांचे हे वक्तव्य कामाकाजातून वगळण्यास सांगितले.
लोकसभेत एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना द्रमुक खासदार ए राजा यांनी गोडसेंच्या विधानाचा हवाला देत म्हणाले की त्याने महात्मा गांधींना का मारले.
यावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवत म्हटले की, आपण इथे एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही.
३२ वर्षांपासून त्याने महात्मा गांधीविरोधात आपल्या मनात द्वेष बाळगल्याचे गोडसेने स्वतः हे कबूल केले होते, असे राजा यांनी म्हटले.
त्यानंतर शेवटी त्याने गांधीजींची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. गोडसेने गांधींची हत्या यासाठी केली की तो एका विशिष्ट विचारधारेचा होता.
यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर भाजपाच्या अनेक खासदारांनीही खासदार साध्वी यांना खाली बसण्याची विनंती केली.
दरम्यान, साध्वी यांच्या या विधानावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली असून आता देश मोदी आणि भाजपाला देखील मनापासून माफ करु शकणार नाही असे म्हटले.
यानंतर सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, पहिल्यांदा तुम्ही माझे विधान पूर्ण ऐका असे सांगत मी यावर उद्या उत्तर देईन.
COMMENTS