वेब टीम : भोपाळ देशातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी या महिन्यात निकाल येणार आहे. या पार्श्वभूमी...
वेब टीम : भोपाळ
देशातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी या महिन्यात निकाल येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तरुण पिठोडे यांनी भोपाळमध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला.
राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून येत्या १७ नोव्हेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे.
भोपाळमध्ये येणारी वाहने कलम १४४ लागू झाल्यानंतर पोलिसांकडून तपासली जात आहेत.शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची शक्यता असेल.
हे कलम लागू असणार्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.
जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.
COMMENTS