वेब टीम : अमरावती आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद...
वेब टीम : अमरावती
आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणार आहे.आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाने बुधवारी या विधेयकाला मंजुरी दिली.
एफआयआर दाखल केल्यानंतर २१ दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देणार असल्याची तरतूद या विधेयकात केली आहे.आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये दुरूस्ती करून नवं ३५४ (ई) हे कलम तयार केले आहे.
भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल.
तसेच याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असे नाव दिले आहे. या व्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनही करणार आहे.
प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे.या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद आहे.
तसेच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद केली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो.या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करणार आहे.
या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, ऍसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवणार आहे.
COMMENTS