वेब टीम : मुंबई शिवसेनेवर कायम टीका करण्यासाठी ओळखले जाणारे किरीट सोमय्या हे युती तुटल्यानंतर शिवसेनेवर तोफ डागण्याचे काम भाजपकडून करू ...
वेब टीम : मुंबई
शिवसेनेवर कायम टीका करण्यासाठी ओळखले जाणारे किरीट सोमय्या हे युती तुटल्यानंतर शिवसेनेवर तोफ डागण्याचे काम भाजपकडून करू लागले होते. त्यांनी थेट मातोश्रीवरही तोफ डागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नाराज होते.
त्यामुळे सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट द्यायला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. या विरोधामुळे भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. आता शिवसेनाच सत्तेवर आल्याने परिस्थिती बदलली.
शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी असा खबळजनक दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
त्याबाबत त्यांनी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठवले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, मी अनेक घोटाळे आत्तापर्यंत उघडकीस आणले, अनेक प्रकरणे उघड केली.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे लोक हल्ला करण्यासाठी आले होते हे लक्षात घेतले पाहिजे. आताही काही धमक्या येत आहेत. शिवसेनेची ही गुंडगीरी जगासमोर यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाठविल्याचंही त्यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.
शिवसेनेकडून भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. शिवसेनेच्या या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी भाजपकडून किरीट सोमय्या मैदानात उतरले होते.
त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. त्यावरून शिवसेनेचे नेते आणि सोमय्यांमध्ये वादही झालेत. त्याचा राग असल्याने सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली होती त्यानंतर सोमय्यांना तिकीट नाकारले होते.